Monday, November 21, 2011

विद्यार्थ्यांमधील कृतीशीलता व बुध्दीमत्ता विकासासाठी शालेय अभ्यासक्रमात कौशल्य शिक्षण


सारांश :
शालेय स्तरावर कौशल्य शिक्षण अंतर्भूत करण्याचा उद्देश हा विद्यार्थांना केवळ रोजगार मिळावा हा नक्कीच नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण वाढीसाठी, त्यांच्यातील विविध बुध्दीमत्तांचा व व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी शालेय शिक्षणात ’उत्पादक कामाचा’ समावेश व्हायला हवा. नविन बुध्दीमत्तेवरील संशोधनाने शिक्षण प्रक्रीयेत ’मन, मेंदू आणि मनगट’ हे एकत्र आल्यावरच चांगले शिक्षण मिळू शकते हे सिध्द केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठा, संघभावना, व्यवहार ज्ञान, सृजनशीलता यांचा विकास होण्यासाठी शाळेत उत्पादक काम व शालेय विषय यांची सांगड घालावी लागेल. माध्यमिक स्तरावरील कौशल्य शिक्षणाकडे ’व्यवसाय शिक्षण’ असे मर्यादीत न पहाता, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००५’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे बुध्दीमत्ता विकासासाठीची शैक्षणिक पध्दत  म्ह्णून पाहीले पाहीजे. याच उद्देशाने महाराष्ट्र व इतर राज्यातील ९० च्या वर माध्यमिक शाळांमधे यशस्वीपणे राबवल्या जाणा-या ’मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ (व्ही १) या व्यवसाय पूर्व अभ्यासक्रमाच्या अनुभवावर हा लेख आधारित आहे.