Saturday, December 29, 2012

स्कूलों में जरुरत है ’कार्य केंद्रि’ शिक्षा की !



स्कूलों में जरुरत है ’कार्य केंद्रि’ शिक्षा की !
-    डॉ.योगेश कुलकर्णी
 
१.       व्यवसाय शिक्षा प्राप्त युवकों में भी बेरोजगारी क्यों

सिर्फ़ व्यवसाय शिक्षा ही आज की रोजगार की समस्या का समाधान नही है ! आज ३०% fresh engineers  unemployed है ! तकनिकी शिक्षा प्राप्त हुए युवामें भी बेरोजगारी बहोत है ! इंजिनिअर , तकनिकी शिक्षा प्राप्त युवा भी नौकरी की तलाश में घुमते है ! दुसरी तरफ़ कई व्यवस्थापनोंका अनुभव है की आज के युवा, कोई श्रम करने के लिए तैयार नही ! हर कोई, कम परिश्रम और उसके प्रमाण में बहोद जादा आमदनी की अपेक्षा करता है ! क्या ऎसी परिस्थिती में केवल किसी एक कौशल्य (Trade) की शिक्षा तकनिकी शिक्षा रोजगार के अवसर तैयार करने में पर्याप्त होगी?   

Tuesday, August 14, 2012

विज्ञान आश्रमाचे हितचिंतक : डॉ.चि.मो.पंडीत



डॉ.चि.मो.पंडीत यांचे निधन झाले. ब-याच दिवसापासून ते आजारी असल्याचे माहीत होते. गेल्या २८ जुलैला त्यांना फ़ोन केला तेंव्हा बोलतांना त्रास होत आहे हे लक्षात आले होते.
पंडीत सर हे डॉ.कलबागांचे मित्र होते. पाबळ मध्ये वैचारिक गप्पा मारण्यासाठी , सहविचारासाठी म्ह्णून डॉ.कलबाग , पंडीत सरांना बोलावत. ते विज्ञान आश्रमाच्या व्यवस्थापन समितीवर १९९७ ते २००३ या काळात होते. मात्र २००३ मध्ये डॉ.कलबागांचे निधन झाल्यावर जेंव्हा व्यवस्थापन समिती पुर्नगठित झाली तेंव्हा आता तुम्ही तरुण मंडळीच व्यवस्थापन समिती वर घ्या असे सांगून ते बाजूला झाले. मात्र वि.आश्रमच्या कामाबाबत , अडचणींबाबत ते सतत जाणून घेत. मराठी विज्ञान परिषदे तर्फ़े डॉ.कलबागांच्या स्मृती प्रित्यर्थ एक चर्चासत्र आयोजित केले गेले. त्याच्या संयोजनात त्यांची मुख्य भूमिका होती.

’आपण केलेली घाण आपणच साफ़ करावी’


३ ऑगस्ट च्या पुणे जिल्हा लोकमत मध्ये, शाळेतील स्वच्छतागृहे स्वच्छ करुन घेतल्या बद्दल मुख्याध्यापकांना निलंबित केल्याची बातमी वाचली. इतर वर्तमान पत्रात पण त्या प्रकारच्या बातम्या आल्या होत्या. त्यासंदर्भात ची दुसरी बाजू समोर मांडत आहे.
श्रम प्रतिष्ठा , स्वच्छतेचे महत्व सांगणारे सुविचार शाळेच्या फ़ळ्यावर नेहमीच दिसतात. निर्मलग्राम , स्वच्छता रॅली मध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच सहभागी करुन घेतले जाते. त्यांच्या कडून घोषणा देऊन घेतल्या जातात. मात्र त्या घोषणा प्रत्यक्षात आणण्याची संधी मात्र आपण विद्यार्थ्यांना देत नाही.

Tuesday, February 21, 2012

IBT ची सुरुवात – यवतमाळ मधील


 
मागील आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातीत बोटोनी गावातील शाळेत IBT उपक्रमात बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन लावले होते. त्यासाठी यवतमाळला गेलो. जातांना रुकसारचा नंबर आठवणीने घेऊन गेलो होतो. दीड-दोन वर्षापूर्वी मुकुटबंध गावातील IBT शाळेतील विद्यार्थ्यांशी बोलतांना, विद्यार्थ्यांनी ’का, कसे, केव्हा, कुठे’ असे प्रश्न विचारायची सवय लावली पाहीजे, योग्य प्रश्न विचारता आले की योग्य उत्‍तरे मिळतील इ. मार्गदर्शन पर बोललो होतो. जाताना तुम्हाला ज्या प्रश्‍नाची उत्तरे मिळणार नाहीत, ती माझ्याकडे पाठवा असे पण सुचवले होते. त्यानंतर काही महिन्यांनी मला शाळेतील मुलींचा फ़ोन आला. दुसर्‍या बाजुला ३-४ मुली असाव्यात असे त्यांच्या कुजबुजी वरुन वाटत होते.

Monday, January 16, 2012

कृतीशिलता व बुध्दीमत्ता विकासासाठी कौशल्य शिक्षण हवे

कृतीशिलता व बुध्दीमत्ता विकासासाठी कौशल्य शिक्षण हवे
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री.कपिल सिब्बल यांनी पारंपारिक आणि व्यावसायिक कौशल्य शिक्षणाची शालेय पातळीवर सांगड घालण्यासाठी सीबीएसी शाळांमध्ये कौशल्य शिक्षणाचा समावेशाचा निर्णय झाल्याची माहीती ’एज्युकॉन २०११’(सकाळ १८ सप्टें २०११) मध्ये दिली. मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने व्यवसाय शिक्षणाबाबत जी श्रीमती .स्वाती मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्या समितीने पण माध्यमिक शिक्षणात ’व्यवसाय पूर्व’ शिक्षण अनिवार्य करण्याची शिफ़ारस केली आहे.
शिक्षणाचे सार्वत्रिकरण होत असतांना , घोकंपट्टी वर आधारित पुस्तकी शिक्षणाच्या अपयश व मर्यादा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. वाढत्या बेकारी मुळे व युवकांमधील वाढत्या निष्क्रीयतेमुळे ’शिकायचे कशासाठी? शिकून काय होणार आहे ?’ हा प्रश्न ही वैफ़ल्यग्रस्त पालकांकडून उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांची घोषणा व महाराष्ट्रातील समितीचा अहवाल स्वागतार्ह आहे.
मात्र शालेय स्तरावर कौशल्य शिक्षणाचा अंर्तभाव करण्यासाठी जी कारणे व त्यातून अपेक्षित साध्ये (उद्दीष्टे) मांडली आहेत त्यातून चांगल्या हेतूने मांडल्या गेलेल्या या कल्पनेच्या भविष्यातील यशस्वीते बाबत शंका येते.