Saturday, December 14, 2013

निर्मितीचा आनंद घेण्यासाठी Do-It-Yourself (D-I-Y) Lab


 एखादी वस्तू तयार केल्याचा, निर्माण केल्याचा आनंद हा खूप मोठा असतो. त्यामुळे मिळणारे समाधान हे स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारे असते. आजच्या विकत घ्या, वापरा आणि फेकाया संस्कृतीत, स्वतःने एखादी गोष्ट तयार करण्याचा आनंद आपण गमावत आहोत. माझ्या लहानपणी म्हणजे २०- २५ वर्षांपूर्वी संक्रांतीला उडवण्यासाठी पतंग बनवणे हा मुलांना मोठा उद्योग असे. त्यासाठी योग्य कागद निवडणे, बांबूची कामटी सोलून योग्य जाडीची कडी बनवणे. काच रांगोळी एकत्र करून पतंगीचा मांजा तयार करणे. या सर्व गोष्टी केल्यावर पतंग उडवणे हा परिपूर्ण अनुभव असे. यात पतंग उडवण्याबरोबरच अनेक कौशल्य व ज्ञान मिळत असे.हाताने काम करत शिकणेही शिकण्याची नैसर्गिक पध्दत आहे व बुध्दिमत्ता विकासासाठी पण आवश्यक आहे, हे आता आधुनिक शिक्षण संशोधनाने पण मान्य केले आहे.  

विज्ञान आश्रमाचा आघाडीचा अभ्यासक्रम मूलभूत ग्रामीण तंत्रज्ञानाची पदविका (DBRT)


विज्ञान आश्रमाने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या आणि अगदी सुरुवातीपासून राबविलेला कार्यक्रम म्हणजे ग्रामीण तंत्रज्ञानाचा. मागच्या अंकात म्हटल्याप्रमाणे हे तंत्रज्ञान चार भागात शिकवले जाते - पर्यावरण - शेती - पशुपालन आणि यांत्रिकी आणि गृह आरोग्य.
ज्यांना कोणाला हे तंत्रज्ञान शिकायचे आहे. त्यांना थोडे गणित, लिहिणे वाचणे व्यवस्थित येते ना, आठवीपर्यंतचे शिक्षण आहे ना, त्यांचे वय चौदा वर्षांपुढे आहे ना, त्यांना एकट्याने घराबाहेर वर्षभर राहता येईल ना, याची खात्री केली जाते. बाकी हिंदी - मराठीचे व्यवहारापुरते ज्ञान असले की मार्कांची काही अट नसते. सर्व प्रकारची मुले, कमकुवत गटातली, अतिरिक्त ऊर्जा दाखवणारी, कमी - जास्त हुशार, काही वेगळे करण्याची इच्छा असलेली - जशी येतील त्या क्रमाने प्रवेश घेऊ शकतात. एच.आय.व्ही. असेलेली देखील असतात, सगळे अभ्यासक्रम ती शिकतात. आमच्या अपेक्षा स्पष्ट असतात. स्वतः हाताने काम करायची तयारी वही. पुढे व्यवसाय करायची इच्छा हवी आणि पाबळसारख्या ठिकाणी एकटे राहण्याची तयारी हवी. आश्रमात कमीतकमी सोयीमध्ये सगळ्यांना रहावे लागते.

Thursday, February 7, 2013

माध्यमिक शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण नव्हे तर ’कार्य केंद्रि’ शिक्षण


उत्पादक कामाचे शिक्षणाचे माध्यम म्हणून असलेले महत्व विविध शिक्षणतज्ञ शिक्षण आयोगांनी मान्य केले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा [२००५]मध्ये ज्ञानरचनावादाचा पुरस्कार केला आहे. अभ्यासक्रम बनवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये १) शाळेतील ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असावा.२) शिकणे हे घोकंपट्टी नसेल ३) अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकांपर्यंत मर्यादित नसेल असे सुचवले आहे. प्रत्यक्ष कामातील सहभागातून विद्यार्थी ज्ञानाचे रुपांतर अनुभवात करु शकतील. त्यातून त्यांच्यात विविध मुल्ये, व्यवहारज्ञान, सृजनशीलता विकसित होतील व त्यासाठी प्राथमिकस्तरापासूनच 'कामातून' शिक्षण देण्याचे सुचवले आहे.

ज्ञान मिळवण्यासाठी : कार्यकेंद्रि शिक्षण


'प्रत्यक्ष  हाताने  काम  करणे' आपल्याकडे नेहमीच  कमी  दर्जाचे  मानले जाते. कारकुनी, कार्यालयीन कामाला पण  श्रेष्ठ  मानतो. खरंतर संशोधक, अंतराळ वीर शल्यचिकित्सा करणारे डॉक्टर ,कलाकार . अनेक यशस्वी व्यक्तींच्या यशामध्ये त्यांच्या कौशल्याचा फार मोठा वाटा असतो. ही कौशल्य केवळ पुस्तके ज्ञानातून नव्हे  तर प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने विकसित होतात. विद्यार्थ्यांमधील धडपड करण्याची वृत्ती, कृतीशीलता, उपक्रमशीलता .अनेक  गुण विकसित होण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष हाताने काम करण्याची संधी मिळायला  हवी.

२१ व्या शतकासाठी : कार्य केंद्रि शिक्षण


१७व्या शतकापासून ते १९५० या काळात शास्त्रीय ज्ञानात दर पंधरा वर्षांनी दुप्पट  या  वेगाने ज्ञाननिर्मिती झाली. मात्र  संगणक क्रांतीने दरवर्षी ६६% या वेगाने नवीन ज्ञान वाढत  आहे. सध्या शालेय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची गणिती क्षमता   स्मरण शक्तीची परीक्षा घेतली  जाते. मात्र  या दोन्ही गोष्टी संगणक  आपल्यापेक्षा खूप उत्तम करू शकतो.