Thursday, February 7, 2013

माध्यमिक शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण नव्हे तर ’कार्य केंद्रि’ शिक्षण


उत्पादक कामाचे शिक्षणाचे माध्यम म्हणून असलेले महत्व विविध शिक्षणतज्ञ शिक्षण आयोगांनी मान्य केले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा [२००५]मध्ये ज्ञानरचनावादाचा पुरस्कार केला आहे. अभ्यासक्रम बनवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये १) शाळेतील ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असावा.२) शिकणे हे घोकंपट्टी नसेल ३) अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकांपर्यंत मर्यादित नसेल असे सुचवले आहे. प्रत्यक्ष कामातील सहभागातून विद्यार्थी ज्ञानाचे रुपांतर अनुभवात करु शकतील. त्यातून त्यांच्यात विविध मुल्ये, व्यवहारज्ञान, सृजनशीलता विकसित होतील व त्यासाठी प्राथमिकस्तरापासूनच 'कामातून' शिक्षण देण्याचे सुचवले आहे.

ज्ञान मिळवण्यासाठी : कार्यकेंद्रि शिक्षण


'प्रत्यक्ष  हाताने  काम  करणे' आपल्याकडे नेहमीच  कमी  दर्जाचे  मानले जाते. कारकुनी, कार्यालयीन कामाला पण  श्रेष्ठ  मानतो. खरंतर संशोधक, अंतराळ वीर शल्यचिकित्सा करणारे डॉक्टर ,कलाकार . अनेक यशस्वी व्यक्तींच्या यशामध्ये त्यांच्या कौशल्याचा फार मोठा वाटा असतो. ही कौशल्य केवळ पुस्तके ज्ञानातून नव्हे  तर प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने विकसित होतात. विद्यार्थ्यांमधील धडपड करण्याची वृत्ती, कृतीशीलता, उपक्रमशीलता .अनेक  गुण विकसित होण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष हाताने काम करण्याची संधी मिळायला  हवी.

२१ व्या शतकासाठी : कार्य केंद्रि शिक्षण


१७व्या शतकापासून ते १९५० या काळात शास्त्रीय ज्ञानात दर पंधरा वर्षांनी दुप्पट  या  वेगाने ज्ञाननिर्मिती झाली. मात्र  संगणक क्रांतीने दरवर्षी ६६% या वेगाने नवीन ज्ञान वाढत  आहे. सध्या शालेय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची गणिती क्षमता   स्मरण शक्तीची परीक्षा घेतली  जाते. मात्र  या दोन्ही गोष्टी संगणक  आपल्यापेक्षा खूप उत्तम करू शकतो.

Saturday, December 29, 2012

स्कूलों में जरुरत है ’कार्य केंद्रि’ शिक्षा की !



स्कूलों में जरुरत है ’कार्य केंद्रि’ शिक्षा की !
-    डॉ.योगेश कुलकर्णी
 
१.       व्यवसाय शिक्षा प्राप्त युवकों में भी बेरोजगारी क्यों

सिर्फ़ व्यवसाय शिक्षा ही आज की रोजगार की समस्या का समाधान नही है ! आज ३०% fresh engineers  unemployed है ! तकनिकी शिक्षा प्राप्त हुए युवामें भी बेरोजगारी बहोत है ! इंजिनिअर , तकनिकी शिक्षा प्राप्त युवा भी नौकरी की तलाश में घुमते है ! दुसरी तरफ़ कई व्यवस्थापनोंका अनुभव है की आज के युवा, कोई श्रम करने के लिए तैयार नही ! हर कोई, कम परिश्रम और उसके प्रमाण में बहोद जादा आमदनी की अपेक्षा करता है ! क्या ऎसी परिस्थिती में केवल किसी एक कौशल्य (Trade) की शिक्षा तकनिकी शिक्षा रोजगार के अवसर तैयार करने में पर्याप्त होगी?   

Tuesday, August 14, 2012

विज्ञान आश्रमाचे हितचिंतक : डॉ.चि.मो.पंडीत



डॉ.चि.मो.पंडीत यांचे निधन झाले. ब-याच दिवसापासून ते आजारी असल्याचे माहीत होते. गेल्या २८ जुलैला त्यांना फ़ोन केला तेंव्हा बोलतांना त्रास होत आहे हे लक्षात आले होते.
पंडीत सर हे डॉ.कलबागांचे मित्र होते. पाबळ मध्ये वैचारिक गप्पा मारण्यासाठी , सहविचारासाठी म्ह्णून डॉ.कलबाग , पंडीत सरांना बोलावत. ते विज्ञान आश्रमाच्या व्यवस्थापन समितीवर १९९७ ते २००३ या काळात होते. मात्र २००३ मध्ये डॉ.कलबागांचे निधन झाल्यावर जेंव्हा व्यवस्थापन समिती पुर्नगठित झाली तेंव्हा आता तुम्ही तरुण मंडळीच व्यवस्थापन समिती वर घ्या असे सांगून ते बाजूला झाले. मात्र वि.आश्रमच्या कामाबाबत , अडचणींबाबत ते सतत जाणून घेत. मराठी विज्ञान परिषदे तर्फ़े डॉ.कलबागांच्या स्मृती प्रित्यर्थ एक चर्चासत्र आयोजित केले गेले. त्याच्या संयोजनात त्यांची मुख्य भूमिका होती.

’आपण केलेली घाण आपणच साफ़ करावी’


३ ऑगस्ट च्या पुणे जिल्हा लोकमत मध्ये, शाळेतील स्वच्छतागृहे स्वच्छ करुन घेतल्या बद्दल मुख्याध्यापकांना निलंबित केल्याची बातमी वाचली. इतर वर्तमान पत्रात पण त्या प्रकारच्या बातम्या आल्या होत्या. त्यासंदर्भात ची दुसरी बाजू समोर मांडत आहे.
श्रम प्रतिष्ठा , स्वच्छतेचे महत्व सांगणारे सुविचार शाळेच्या फ़ळ्यावर नेहमीच दिसतात. निर्मलग्राम , स्वच्छता रॅली मध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच सहभागी करुन घेतले जाते. त्यांच्या कडून घोषणा देऊन घेतल्या जातात. मात्र त्या घोषणा प्रत्यक्षात आणण्याची संधी मात्र आपण विद्यार्थ्यांना देत नाही.

Tuesday, February 21, 2012

IBT ची सुरुवात – यवतमाळ मधील


 
मागील आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातीत बोटोनी गावातील शाळेत IBT उपक्रमात बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन लावले होते. त्यासाठी यवतमाळला गेलो. जातांना रुकसारचा नंबर आठवणीने घेऊन गेलो होतो. दीड-दोन वर्षापूर्वी मुकुटबंध गावातील IBT शाळेतील विद्यार्थ्यांशी बोलतांना, विद्यार्थ्यांनी ’का, कसे, केव्हा, कुठे’ असे प्रश्न विचारायची सवय लावली पाहीजे, योग्य प्रश्न विचारता आले की योग्य उत्‍तरे मिळतील इ. मार्गदर्शन पर बोललो होतो. जाताना तुम्हाला ज्या प्रश्‍नाची उत्तरे मिळणार नाहीत, ती माझ्याकडे पाठवा असे पण सुचवले होते. त्यानंतर काही महिन्यांनी मला शाळेतील मुलींचा फ़ोन आला. दुसर्‍या बाजुला ३-४ मुली असाव्यात असे त्यांच्या कुजबुजी वरुन वाटत होते.